﻿<?xml version="1.0" encoding="utf-8"?><rss version="2.0"><channel><title>Bipin Joshi.com | Thus said a Yogi</title><link>http://www.bipinjoshi.com</link><description>Bipin Joshi.com | Thus said a Yogi</description><copyright>Copyright (C) bipinjoshi.com. All rights reserved.</copyright><generator>BinaryIntellect RSS Generator</generator><item><title>शिवभक्ताचे आचरण</title><link>http://www.bipinjoshi.com/articles/4adf0efa-2bdc-4757-8689-beb9cb90a089.aspx</link><description>प्रत्येक शिवभक्ताला आपले आध्यात्मिक आचरण कसे असावे ते माहित असणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आजच्या काळाला अनुसरून सर्वसामान्य संसारी आयुष्य जगणार्‍या शिवभक्ताचे आचरण कसे असावे ते थोडक्यात येथे देत आहे. हे नियम पाळून साधनारत राहिल्यास एक ना एक दिवस सदाशिव प्रसन्न झाल्याशिवाय रहाणार नाही.</description><pubDate>04 Sep 2010 12:00:00 GMT</pubDate></item><item><title>पशू, पाश आणि पति</title><link>http://www.bipinjoshi.com/articles/a66c805b-e494-478d-a4d3-0628c4298abf.aspx</link><description>अध्यात्मशास्त्रातील प्रत्येक दर्शन स्वतःची अशी एक वैचारीक बैठक प्रस्तुत करत असते जीच्यावर त्या दर्शनातील साधनामार्ग अवलंबून असतो. शैव दर्शनाचे अनेक भेद आहेत जसे काश्मिरी शैवदर्शन, वीर शैवदर्शन, पाशुपत मत, थिरूमुलारचा शैवसिद्धांत, गोरक्षनाथांचा सिद्ध सिद्धांत इत्यादी. शैव दर्शनांच्या सर्वच शाखांमध्ये 36 शिवतत्वे ग्राह्य मानली गेली आहेत. कपिलमुनी प्रणित सांख्य तत्वज्ञानाच्या चोवीस तत्वांमध्येच भर घालून शैवांची ही 36 तत्वे बनली आहेत. ही 36 तत्वे सामान्य साधकाला समजण्यास काहीशी किचकट वाटतात म्हणून येथे ह्या 36 तत्वांविषयी न लिहिता शैव दर्शनाचा मुळ गाभा असलेल्या तीन तत्वांविषयी लिहित आहे. ही तीन तत्वे म्हणजे - पशू, पाश आणि पति.</description><pubDate>30 Aug 2010 12:00:00 GMT</pubDate></item><item><title>शिवयोग अर्थात शिव-शक्ती सामरस्य</title><link>http://www.bipinjoshi.com/articles/e69bc99f-9839-415f-9c0f-37c7083a7a01.aspx</link><description>कर्मकांडात्मक उपासना, व्रतवैकल्ये, स्थुल पुजा हा आध्यात्म मार्गावरचा एक टप्पा असला तरी अशी कर्मकांडात्मक उपासना साधकाला आपल्या ध्येयाप्रत नेऊ शकत नाही. ते सामर्थ्य केवळ एकाच मार्गात आहे आणि तो मार्ग म्हणजे योगमार्ग. स्वतः भगवान शंकर शिवसंहितेत पार्वतीला सांगतात...</description><pubDate>24 Aug 2010 12:00:00 GMT</pubDate></item><item><title>शिवनामाचा महिमा</title><link>http://www.bipinjoshi.com/articles/27d1c229-4638-49b0-afd0-2aa710c6db2e.aspx</link><description>शिवशंकराच्या सर्व मंत्रांत श्रेष्ठ आणि सर्वात अधिक प्रचलित असलेला मंत्र म्हणजे पंचाक्षर मंत्र. पंचाक्षर मंत्र एवढा प्रसिद्ध आहे की तो सांगण्याची गरजच नाही. या मंत्राचे महात्म्य आणि श्रेष्ठत्व प्रसिद्ध शिवभक्त उपमन्युने श्रीकृष्णाला शिवपुराणात विस्ताराने सांगितले आहे. शिव-पार्वती संवादरूपाने ते शिवपूराणाच्या वायवीय संहितेमध्ये आलेले आहे. आपणही ते जाणून घेण्याचा प्रयत्न येथे करणार आहोत...</description><pubDate>15 Aug 2010 12:00:00 GMT</pubDate></item><item><title>श्रीशंकराची प्रभावी व्रते - का आणि कशी?</title><link>http://www.bipinjoshi.com/articles/9522b3d8-3293-48a4-8b1c-7104a9e4f844.aspx</link><description>आपल्याकडे व्रतं ही बरेचवेळा काहीतरी काम्यकर्म मनात धरून केली जातात. जसे आर्थिक उन्नती, पुत्रप्राप्ती, विवाह विषयक, पारिवारीक सुखसमृद्धी इत्यादी. व्रतांमुळे अशा प्रकारच्या इच्छा किती प्रमाणात पूर्ण होतात हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा भाग आहे. योगसाधकाच्या दृष्टीने बघायचे झाले तर काम्यकर्मांची पूर्तता हा व्रतांचा तसा गौण फायदा आहे. व्रतांचे पालन करण्यामागे काही आध्यात्मिक कारणे आहेत जी जास्त महत्वाची आहेत. म्हणुनच तर योगशास्त्रात 'व्रत' हा यम-नियमांमधील एक अविभाज्य घटक आहे. आता व्रतांचे आध्यात्मिक फायदे कोणते? तर पुढील प्रमाणे...</description><pubDate>08 Aug 2010 12:00:00 GMT</pubDate></item><item><title>गेल्या रविवारची गुरूपौर्णिमा - काही गोष्टी</title><link>http://www.bipinjoshi.com/articles/a421527a-0b1d-4f05-8cad-e159b5d1c588.aspx</link><description>गेल्या रविवारी म्हणजे 25 तारखेला गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने माझ्याकडून ध्यानधारणा शिकलेले अनेक जण भेटून गेले. काहींनी अपरिहार्य कारणामुळे येण्याची इच्छा असूनही येणे शक्य झाले नाही असे आवर्जून कळवले. दिवसभर कोण ना कोण येतच होते. त्यांच्याशी बोलताना अनेक विषय निघत होते, प्रश्नोत्तरे होत होती. त्यातूनच निवडलेले काही महत्वाचे मुद्दे जे सर्वच साधकांना उपयोगी पडू शकतील ते येथे देत आहे. ही नोंद काहीशी विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे कारण हे सगळे मुद्दे वेगवेगळ्या साधकांशी झालेल्या बोलण्यातून काढलेले आहेत.</description><pubDate>01 Aug 2010 12:00:00 GMT</pubDate></item><item><title>शिवगुरू आणि ऋषभयोग्याचा अमुल्य उपदेश</title><link>http://www.bipinjoshi.com/articles/d215c09e-e691-4ba5-9342-5af7c7de09e6.aspx</link><description>भगवान विष्णू दुष्टांच्या निर्मुलनासाठी वारंवार अवतार घेतो हे तर सर्वश्रुतच आहे. श्रीशंकर मात्र वेगळ्या स्वरूपात आपले कार्य अखंडपणे चालू ठेवतो. श्रीशंकराचे हे रूप म्हणजे गुरू. अनादी कालापासून शंकराला सर्वांनीच गुरू रूपात स्विकारलेले आहे. विशेषतः योगशास्त्रात शंकराला आदिगुरू म्हणून अत्यंत भक्तिभावाने पुजले जाते. महाराष्ट्रात वेदतुल्य मानल्या गेलेल्या गुरूचरित्रातही शंकराचा उल्लेख 'पूर्वपीठ शंकरू' असाच आहे. शंकराकडून विष्णुला आणि विष्णुकडून ब्रह्माला असे ज्ञानाचे संक्रमण झाले असे त्यात सांगितले आहे. नाथसंप्रदायाचे लोकप्रिय ग्रंथ नवनाथ भक्तिसार आणि नाथलिलामृतही शंकराकडून ही योगविद्या पंथाला कशी प्राप्त झाली त्याचे वर्णन करतात. योगशास्त्राची अशी मान्यता आहे की योगशास्त्र हे सर्वप्रथम श्रीशंकराने पार्वतीला सांगितले. म्हणजेच पार्वती शंकराची प्रथम शिष्या. तेथून मग गुरू-शिष्य परंपरेने ते आज आपल्यापर्यंत उपलब्ध झाले.</description><pubDate>25 Jul 2010 12:00:00 GMT</pubDate></item></channel></rss>